MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, 2023

 महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३.

वन्यप्राणी नुकसानभरपाई अधिनियम २०२३ अंतर्गत शेतकरी आणि वन अधिकारी शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून कागदपत्रे भरताना. पार्श्वभूमीत जंगलात वाघ, बिबट्या, हत्ती, हरीण आणि रानडुक्कर यांसारखे वन्यजीव दिसत असून उजव्या बाजूला मराठीत 'वन्यप्राणी नुकसानभरपाई अधिनियम, २०२३' असे लिहिले आहे.

 क्रमांक डब्ल्यूएलपी ०२.२३/प्र.क्र.५२ (भाग-२)/फ-१. महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३ (२०२३ चा महा. ३७) याच्या कलम ८ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, पुढील नियम करीत आहे:-

------------

वाचावे : वन्यप्राणी यांच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मृत पावल्यास त्याचे शव जागेवरून न हलवता वन्यप्राण्यास पूर्ण खावू देऊन भरपाई देण्याची प्रक्रिया करावी : परिपत्रक

------------

१. संक्षिप्त नाव. या नियमांस, महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३, असे म्हणावे,

२. व्याख्या. (१) या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर, -

(क) “अधिनियम" याचा अर्थ, महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३ (२०२३ चा महा. ३७), असा आहे;

(ख) "कुटुंब" याचा अर्थ, बळी पडलेल्या व्यक्तीची पत्नी, पती, मुले, आई किंवा वडील, असा आहे;
(ग) “नमुना" याचा अर्थ, या नियमांस जोडलेला नमुना, असा आहे.

(२) या नियमात वापरलेले, परंतु व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, या अधिनियमान्वये अनुक्रमे जो अर्थ नेमून दिलेला आहे तोच अर्थ असेल

३. इतर प्रकारच्या इजा किंवा नुकसान. अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट-कलम (२) मध्ये तरतूद केलेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या इर्जाच्या किंवा नुकसानीच्या प्रकारांशिवाय, राज्य शासन, उक्त अधिनियमान्वये, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवाला झालेल्या किरकोळ इजांसाठी देखील नुकसानभरपाई प्रदान करील.

४. मंजुरी देणारा प्राधिकारी. ज्या क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची घटना घडली आहे त्या क्षेत्रावर अधिकारिता असणारा सहायक वनसंरक्षक हा, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी मंजुरी देणारा प्राधिकारी असेल.

---------

वाचावे : वन्यप्राणीमुळे झालेल्या नुकसानीचे दरपत्रक अधिसूचना 2023

--------

५. मानवी जीवितहानी व मानवास इजा झाल्यास, नुकसानभरपाई प्रदान करण्याची कार्यपद्धती :-

( १) मानवी जीवितहानी झाल्यास, -

(क) वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवी जीवितहानी झाल्याबद्दलची सूचना, कोणत्याही व्यक्तीद्वारे, तात्काळ जवळच्या वनरक्षकाला लेखी स्वरूपात देण्यात येईल. अशी सूचना मिळाल्यानंतर, वनरक्षक, अशी घटना घडली आहे किंवा कसे याची खात्री करील आणि घटनेची माहिती गोळा करील आणि वस्तुस्थिती संबंधित वनपालास आणि वनक्षेत्रपालास तात्काळ कळवील.

(ख) अशा प्रकरणी, अधिनियमान्वये प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईसाठी, मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांद्वारे, अशा घटनेपासून अट्ठेचाळीस तासांच्या आत, संबंधित वन क्षेत्रपालाकडे नमुना एकमध्ये अर्ज करण्यात येईल,

(ग) वनक्षेत्रपाल, खंड (ख) खालील असा अर्ज प्राप्त झाल्यावर, घटनास्थळास भेट देईल आणि असा अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत, आवश्यक ती चौकशी करील, वनक्षेत्रपाल, अशा चौकशीनंतर, पंचनामा करील,

(घ) अशा प्रकरणी, वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे शवविच्छेदन करण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी, शवविच्छेदनानंतर, शवविच्छेदन अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवतील.

-------------

वाचावे : सर्व पशुधनची Ear Tagging करून त्याची नोंद NDLM प्रणालीवर घेण्याबाबत. शासन निर्णय 

------------- 

(२) मानवास कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास, मोठी किंवा किरकोळ इजा झाल्यास, -

(क) वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवाला कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास, मोठी किंवा किरकोळ इजा झाल्यास, अधिनियमान्वये प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईसाठी, जखमी व्यक्तीद्वारे स्वतः किंवा तिच्या कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, अशा घटनेपासून अट्ठेचाळीस तासांच्या आत, ज्या क्षेत्रात असा हल्ला झाला आहे त्या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या वनक्षेत्रपालकडे, नमुना एकमध्ये अर्ज करण्यात येईल. अर्जदार, अशा अर्जासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी केलेल्या बळी पडलेल्या व्यक्तीच्या तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील सादर करील.

(ख) वनक्षेत्रपाल, खंड (क) खालील अर्ज प्राप्त झाल्यावर, घटनास्थळास भेट देण्यासाठी आणि असा अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत, आवश्यक चौकशी करण्यासाठी वनपालास निदेश देईल, वनपाल, अशा चौकशीनंतर, पंचनामा करील, वनपाल, त्याचा अहवाल पंचनाम्यासह वनक्षेत्रपालास सादर करील.

(३) वनक्षेत्रपाल, वनपालाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्याच्या विशिष्ट शिफारशीसह अर्ज, सर्व बाबतीत परिपूर्ण असलेल्या अर्ज प्राप्त झाल्यापासून वीस दिवसांच्या आत, सहायक वनसंरक्षकाकडे पाठवील.

(४) जर संबंधित व्यक्ती, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) याच्या कोणत्याही तरतुदींचे किंवा त्याखालील केलेल्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करीत असताना, वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची घटना घडली असेल तर, जखमी झालेली किंवा मृत व्यक्ती, कोणत्याही नुकसानभरपाईसाठी पात्र असणार नाही.

---------

वाचावे : हत्तीच्या हल्ल्यात व्यक्ती मृत्यू किंवा जखमी झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाई बाबत शासन निर्णय 

----------

६. मानवी जीवितहानी झाल्यास नुकसानभरपाईचे प्रदान करणे. -

(१) मृत व्यक्ती प्रौढ असल्यास, नुकसानभरपाईची रक्कम पुढीलप्रमाणे असेल :-

(क) जर मृत व्यक्तीची पत्नी / पती जिवंत असेल तर, पत्नी/ पती व मुले यांना समान हिस्सा देण्यात येईल;

ख) जर पत्नी/ पती जिवंत नसेल तर,-
(एक) जर सर्व मुले सज्ञान, असतील तर, मागे हयात असलेल्या सर्व मुलांमध्ये, नुकसानभरपाईचे समसमान विभाजन करण्यात येईल

(दोन) जर मूल अज्ञान असेल तर, नुकसानभरपाईच्या रकमेतील त्याचा हिस्सा, असे अज्ञान मूल व संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्या संयुक्त नावाने उघडलेल्या खात्यात जमा करण्यात येईल. जमा केलेली अशी नुकसानभरपाईची रक्कम, अशा अज्ञान मुलाचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्याला प्रदान करण्यात येईल.

 (ग) जर मृत व्यक्तीची पत्नी/ पती आणि मुले जिवंत नसतील तर, नुकसानभरपाईची रक्कम, मृत व्यक्तीच्या आई-वडिलांना प्रदान करण्यात येईल.

(२) मृत व्यक्ती अज्ञान असल्यास, नुकसानभरपाईची रक्कम, पुढीलप्रमाणे असेल:-

(क) नुकसानभरपाईची रक्कम, मृत व्यक्तीच्या आई वडिलांना प्रदान करण्यात येईल;

(ख) जर आई-वडील जिवंत नसतील तर, मृत व्यक्तीच्या भावंडांना समान रक्कम देण्यात येईल, जर भावंडे अल्पवयीन असतील तर, पोट-नियम (१) च्या खंड (ख) च्या उप-खंड (२) च्या तरतुदी, योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील.

(३) जर मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांच्या बाबतीत, कोणताही वाद उद्भवला तर, उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच केवळ नुकसानभरपाईची रक्कम प्रदान करण्यात येईल.

(४) नुकसानभरपाईची चाळीस टक्के रक्कम, मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने, ती ज्या व्यक्तीला मंजूर केलेली आहे त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात येईल आणि नुकसानभरपाईची साठ टक्के रक्कम, अशा व्यक्तीच्या मासिक व्याज मिळणाऱ्या मुदत ठेव खात्यात दहा वर्षांसाठी जमा करण्यात येईल, दहा वर्षांनंतर, मुदत ठेवीची मुदत समाप्त झाल्यावर, अशा खात्यातील रक्कम त्या व्यक्तीला प्रदान करण्यात येईल,

(५) बळी पडलेल्या कुटुंबातील सदस्याचा गंभीर आजार, शैक्षणिक प्रयोजन व विवाह यासाठी, मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने, मुदत ठेवीतील रक्कम, काढता येऊ शकेल.

७. पशु जीवांची हानी किंवा पशुंना इजा पोहचल्यास, नुकसानभरपाई प्रदान करण्याची कार्यपध्दती.-

(१) पशु जीवांची हानी झाल्यास किंवा पशुंना इजा पोहचल्यास, पशुंचा मालक, नुकसानभरपाईचा दावा करण्यासाठी त्या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या संबंधित वनक्षेत्रपालाकडे, अट्ठेचाळीस तासांच्या आत, नमुना दोनमध्ये अर्ज करील.

(२) पहुंचा मालक, तो किंवा कोणतीही व्यक्ती, वनपालाकडून निरीक्षण करण्यात येईपर्यंत, अशा पशुचे शव घटनास्थळावरून हलविले जाणार नाही याची काळजी घेईल, अन्यथा, तो नुकसानभरपाईसाठी पात्र असणार नाही.

(३) वनक्षेत्रपाल, खंड (क) खालील अर्ज प्राप्त झाल्यावर, घटनास्थळास भेट देण्यासाठी आणि असा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत, आवश्यक ती चौकशी करण्यासाठी संबंधित वनपालास निदेश देईल, वनपाल, अशा चौकशीनंतर, पंचनामा करील.

(४) वनपाल मृत झालेल्या किंवा जखमी झालेल्या पशुची, शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून
घेईल, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, मृत झालेल्या किंवा जखमी झालेल्या पशुची तपासणी केल्यानंतर, पशुचा मृत्यू किंवा इजा, वन्य प्राण्यामुळे झाली आहे किंवा नाही याची विशिष्ट निरीक्षणे नोंदविल्यावर, वनपालाला वैद्यकीय प्रमाणपत्र देईल, वनपाल, पंचनाम्यासह त्याचा अहवाल आणि असे वैद्यकीय प्रमाणपत्र वनक्षेत्रपालास सादर करील.

(५) वनक्षेत्रपाल, वनपालाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पशुच्या बाजार मूल्याचे मूल्यानिर्धारण करील. वनक्षेत्रपाल, असा अर्ज व त्याच्या विशिष्ट शिफारशींसह आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज, सर्व बाबतीत परिपूर्ण असलेला अर्ज प्राप्त झाल्यापासून वीस दिवसांच्या आत, सहायक वनसंरक्षकास पाठवावीत.

(६) जेथे पशुंना प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे अशा राष्ट्रीय उद्यानाच्या किंवा अभयारण्याच्या कोणत्याही क्षेत्रात अशा पशुने प्रवेश केला असेल आणि अशा क्षेत्रातील वन्य प्राण्याने पशुला ठार मारले असेल तर, अर्जदार, या अधिनियमाखालील नुकसानभरपाईसाठी पात्र असणार नाही.

(७) जर, कोणत्याही वन्य प्राण्याचा, घटनेच्या ठिकाणापासून दहा किलोमीटरच्या परिघात, विषबाधेमुळे सहा दिवसांच्या आत मृत्यू झाला असेल तर, अशा पशुचा मालक, या अधिनियमान्वये नुकसानभरपाई मिळण्यास पात्र असणार नाही. 

८. पिकांचे व फळझाडांचे नुकसान झाल्यास किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाईचे प्रदान करण्याची कार्यपध्दती.-

(१) पिकांचे किंवा फळझाडांचे नुकसान झाल्यास, मालक, या अधिनियमान्वये प्रदेव असलेली नुकसानभरपाई मिळण्यासाठी, जेथे असा हल्ला झाला असेल त्या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या संबंधित वनक्षेत्रपालाकडे, बहात्तर तासांच्या आत, नमुना - तीनमध्ये अर्ज करील.

(२) पिकांचे किंवा फळझाडांचे नुकसान झाल्यास, त्या क्षेत्राचा वनरक्षक, कृषी सहायक व तलाठी यांचा समावेश असलेली समिती, संयुक्तपणे शेताची पाहणी करील आणि वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यनिर्धारण करील आणि अहवाल तयार करील आणि अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, अहवाल, वनक्षेत्रपालास सादर करील.

(३) जंगली हत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास, मालक, या अधिनियमान्वये प्रदेय असलेली नुकसानभरपाई मिळण्यासाठी, जेथे असा हल्ला झाला असेल त्या क्षेत्रावर अधिकरिता असणाऱ्या संबंधित वनक्षेत्रपालाकडे, बहात्तर तासांच्या आत्त, नमुना- तीनमध्ये अर्ज करील.

(४) जंगली हत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास, त्या क्षेत्राचा वनक्षेत्रपाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता च तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा समावेश असलेली समिती, नुकसानीची पाहणी करील व मूल्यनिर्धारण करील आणि अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, पंचनामा करील. अशा घटनेत, समितीकडून पंचनामा व नुकसानीचे मूल्यनिर्धारण पूर्ण होईपर्यंत, अर्जदार, कोणतीही गोष्ट हलविणार किंवा घटनास्थळाचे चित्र बदलणार नाही किंवा दुरुस्तीचे कोणतेही काम करणार नाही.

(५) वनक्षेत्रपाल, पोट-नियम (३), व यथास्थिति, पोट-नियम (४) मध्ये निर्दिष्ट केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, अर्ज व अशा समितीचा अहवाल त्याच्या विशिष्ट शिफारशींसह, तात्काळ, सहायक वनसंरक्षकांकडे पाठवील.

 (६) पुढील प्रकरणी नुकसानभरपाई प्रदेय असणार नाही:-
(ख) जमिनीच्या मालकाने किंवा लागवडदाराने, घटनेच्या दिनांकापासून गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) किंवा वन्य जीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) या खालील कोणताही अपराध केलेला असेल तर.

९. व्याज दर. 

जर नुकसानभरपाईचे प्रदान करण्यास, वनक्षेत्रपालास, सर्व बाबतीत परिपूर्ण असलेला अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसपिक्षा अधिक विलंब झाला असेल तर, नुकसानभरपाईच्या रक्कमेसह, नुकसानभरपाईच्या रकमेवर दर साल सहा टक्के दराने व्याज प्रदेय असेल.

(क) जर लागवडीखालील जमीन हो, वन जमिनीवरील नियमित न केलेले अतिक्रमण असेल तरः


❓ महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई अधिनियम, 2023 - सर्वसाधारण प्रश्नोत्तरे (FAQ)

---

1️⃣ या अधिनियमाचे नाव काय आहे आणि तो कधीपासून लागू आहे?

👉 या अधिनियमाचे नाव आहे "महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, 2023" (2023 चा महा. 37). हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने कलम 8(1) अंतर्गत नियम बनवून लागू केला आहे, ज्याद्वारे वन्य प्राण्यांमुळे झालेल्या मृत्यू, इजा, पशुधन, पिके किंवा मालमत्तेच्या नुकसानीबाबत नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया निश्चित केली आहे.

---

2️⃣ कोणत्या घटनांसाठी नुकसानभरपाई मिळू शकते?

👉 पुढील घटनांकरिता नुकसानभरपाई मंजूर होते:

 मानवाच्या मृत्यूच्या घटनांसाठी

मानवाला झालेल्या कायमस्वरूपी दिव्यांगत्व, मोठ्या किंवा किरकोळ इजांसाठी

पशुधनाचा मृत्यू किंवा जखम झाल्यास

 पिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास

जंगली हत्ती किंवा वन्य प्राण्यांमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास

---

3️⃣ नुकसानभरपाईसाठी अर्ज कुठे आणि किती वेळेत करावा?

👉 प्रत्येक प्रकरणासाठी अर्ज निश्चित नमुन्यात आणि ठराविक वेळेत करावा लागतो:

मानव मृत्यू/इजा: 48 तासांच्या आत

 पशुधन मृत्यू/इजा: 48 तासांच्या आत

🌿 पिके/फळझाडे/मालमत्ता नुकसान: 72 तासांच्या आत

अर्ज संबंधित क्षेत्राच्या वनक्षेत्रपाल (Range Forest Officer) यांच्याकडे सादर करावा.

---

4️⃣ मानवी मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई मिळविण्याची प्रक्रिया काय आहे?

👉 प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:

1. घटनेची माहिती तात्काळ जवळच्या वनरक्षकास लेखी स्वरूपात द्यावी.

2. मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांनी 48 तासांच्या आत नमुना-1 मध्ये अर्ज सादर करावा.

3. वनक्षेत्रपाल 3 दिवसांच्या आत चौकशी करून पंचनामा करील.

4. शवविच्छेदन अहवाल संबंधित वैद्यकीय अधिकारी देईल.

5. सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर, अर्ज 20 दिवसांच्या आत सहायक वनसंरक्षकाकडे पाठवला जाईल.

6. पात्र असल्यास नुकसानभरपाई मंजूर केली जाईल.

---

5️⃣ नुकसानभरपाई कोणाला आणि कशी दिली जाते?

👉 नुकसानभरपाई पुढीलप्रमाणे दिली जाते:

जर मृत व्यक्तीचे पती/पत्नी जिवंत असतील तर, नुकसानभरपाई पत्नी/पती आणि मुलांना समान वाटणीने दिली जाते.

जर पत्नी/पती मृत असतील, नुकसानभरपाई मुलांमध्ये समान वाटणीने केली जाते.

जर पत्नी/पती आणि मुले दोघेही नसतील, नुकसानभरपाई आई-वडिलांना दिली जाते.

💰 नुकसानभरपाईचे 40% तात्काळ देण्यात येते आणि उर्वरित 60% रक्कम 10 वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवली जाते.

---

6️⃣ पशुधनाच्या मृत्यू किंवा जखमेबाबत नुकसानभरपाईसाठी काय करावे?


👉 मालकाने पुढीलप्रमाणे करावे:

घटनेनंतर 48 तासांच्या आत नमुना-2 मध्ये अर्ज सादर करावा.

पशूचे शव वनपाल तपासणी करेपर्यंत हलवू नये, अन्यथा नुकसानभरपाई मिळणार नाही.

पशुवैद्यकीय अधिकारी तपासणी करून प्रमाणपत्र देतात.

वनक्षेत्रपाल बाजारभावानुसार नुकसानभरपाईचे मूल्यमापन करतो.

---

7️⃣ पिके, फळझाडे किंवा मालमत्तेच्या नुकसानीसाठी प्रक्रिया काय आहे?

👉 प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:

अर्ज 72 तासांच्या आत नमुना-3 मध्ये सादर करावा.

समिती (वनरक्षक, कृषी सहायक, तलाठी) शेत पाहणी करून 10 दिवसांच्या आत अहवाल तयार करेल.

मालमत्ता नुकसानीच्या प्रकरणात, समिती (कनिष्ठ अभियंता, तलाठी/ग्रामसेवक) पंचनामा आणि मूल्यनिर्धारण करेल.

पंचनामा पूर्ण होईपर्यंत अर्जदाराने कोणतेही दुरुस्ती काम करू नये.

---

8️⃣ कोणत्या प्रकरणात नुकसानभरपाई मिळणार नाही?

👉 पुढील परिस्थितीत नुकसानभरपाई मंजूर होणार नाही:

जर व्यक्ती किंवा मालकाने वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 किंवा भारतीय वन अधिनियम, 1927 चे उल्लंघन केले असेल.

पशूने राष्ट्रीय उद्यान/अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून मृत्यू पत्करला असेल.

घटनेनंतर 10 किमी परिसरात विषबाधेमुळे वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यास.

जमीन अनधिकृत अतिक्रमणाखालील असल्यास.

---

9️⃣ नुकसानभरपाई देण्यात विलंब झाल्यास काय?

👉 जर अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत नुकसानभरपाई दिली गेली नाही, तर अर्जदारास वार्षिक 6% व्याजासह नुकसानभरपाईची रक्कम दिली जाईल.

---

🔟 विशेष अट: अनधिकृत अतिक्रमणाच्या जमिनीबाबत

👉 जर पीक लागवडीखालील जमीन ही वन जमिनीवरील नियमित न केलेले अतिक्रमण असेल, तर अशा प्रकरणी नुकसानभरपाई प्रदाय नाही.


----------------------------------------

Maharashtra Wild Animal Compensation Act 2023 अंतर्गत मानवी मृत्यू (human death), इजा (injury), पशुधन हानी (livestock loss), पिकांचे नुकसान (crop damage) आणि मालमत्तेची हानी (property damage) यासाठी नुकसानभरपाई (compensation) मिळविण्याची प्रक्रिया, अर्जाची वेळमर्यादा (application timeline), आवश्यक कागदपत्रे (required documents) आणि पात्रता अटी (eligibility conditions) जाणून घ्या. वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे झालेल्या हानीबद्दल कोण पात्र आहे, अर्ज कुठे करावा, कोणत्या प्रकरणात नुकसानभरपाई मिळणार नाही आणि विलंब झाल्यास व्याज (interest) किती मिळते याबाबत सविस्तर माहिती येथे दिली आहे. हा अधिनियम 2023 (Maha.37) महाराष्ट्र सरकारने तयार केला असून वनक्षेत्रपाल, वनपाल आणि सहायक वनसंरक्षक यांच्या माध्यमातून नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण होते.

----------------------------------------------

Post a Comment

0 Comments